महाराष्ट्रातील पहिले तंत्रस्नेही शिक्षिका संमेलन
आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर तंत्रस्नेही होण्याशिवाय पर्याय नाही. भविष्याची ही गरज ओळखून आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शिक्षिका तंत्र स्नेही व्हाव्यात यासाठी ज्ञान-मान-सन्मान हे ब्रीदवाक्य असलेल्या
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका
समूहाची निर्मिती करून महाराष्ट्रातील हजारो महिला शिक्षिकांना एकत्र आणून एक स्वतःचे मुक्त व्यासपीठ मिळवून दिले आहे..
रविवार दि. ११ मार्च २०१८ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी , जि. अहमदनगर या ठिकाणी राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका
(आम्ही सावित्रीच्या लेकी ) समूहामार्फत महाराष्ट्रातील पहिले महिलांनी महिलांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा व संमेलन आयोजित केले. या संमेलनात सहभागी सर्वच महिलांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तर सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्याचा विक्रम या समुहाने केला आहे.
या समूहांतून शै. साहित्य निर्मिती,तंत्रज्ञान कार्यशाळा, विविध शैक्षणिक व डिजिटल माहिती पुरवून आपली शाळा , विद्यार्थी प्रगत करून
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण महिला शिक्षिकांना तंत्रस्नेही करण्याचे
शिक्षणोपयोगी कार्य करीत आहात.
संमेलन समूह प्रमुख
श्री सुदाम साळुंके सर पुणे,
संमेलन समूह प्रशासक
करुणा गावंडे चंद्रपूर
सहप्रशासक
अनुताई जेवळीकर उस्मानाबाद.
अपर्णा ढोरे, अकोला.
हेमा देशमुख, महाड.
संमेलन सहाय्यक वैशाली भामरे, नाशिक , उमेश साळुंके अहमदनगर व संमेलन मार्गदर्शक श्री.मधुकर माळी, सोलापूर.
आपण जे शैक्षणिक कार्य करत आहात ते संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद असून , न भूतो न भविष्यती
असे विशाल कार्य करत आहात.
आपल्या या तंत्रस्नेही महिला सक्षमीकरण सुहृद्य कार्यासाठी आपणास “विशेष राज्य पुरस्कार 2018” सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे.