स्वराज्याचे मावळे पुस्तक समिक्षण



Date: 26 Mar 2020

*"स्वराज्याचे मावळे"* तरूणांना स्फुर्ती व प्रेरणा देणारा काव्यसंग्रह.....

=====================
               शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी.     
     "स्वराज्याचे मावळे " 
या शीर्षकाखाली शिवछत्रपतींच्या तीस  जिगरबाज शूर मावळ्यांच्या शौर्याचे व पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे.    
 वाशिमच्या अजिंक्य प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे.      
    मुखपृष्ठावर सिंहासनारुढ राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज , माँसाहेब जिजाऊ व
सोबत भगव्या पताका हाती घेतलेले स्वराज्याचे मावळे रेखाटले आहे. तर मल पृष्ठावर मीनाक्षी ताईंनी आपल्या कार्याचा परिचय चित्रीत केला आहे. 
       वाशिम जिल्ह्यातील या कवयित्रीने " स्वराज्याचे मावळे "  या  काव्यसंग्रहातून प्रत्येक मावळ्याच्या व्यक्तिवैशिष्टयांचे व त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे अप्रतिम वर्णन केले आहे. 
 " स्वराज्य रक्षक संभाजी " या मराठी ऐतिहासिक  मालिकेचे मुख्य अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे   यांनी  आपल्या संदेशात म्हटले आहे, समाजाला माहित नसणाऱ्या ३० मराठा , मुस्लिम शूर मावळ्यांचा इतिहास आपण   "स्वराज्याचे मावळे " या काव्य संग्रहाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचवणार असल्याबद्दल मिनाक्षीताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.
     प्रस्तुत काव्यसंग्रहाला चित्रपट निर्माते कवी , लेखक , समिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व  असलेले   श्री. संदीप राक्षे  सर यांनी प्रस्तावना  लिहीली आहे. 
   या काव्य संग्रहाचे एक आगळे वेगळे वैशिष्टये म्हणजे यामध्ये शिवरायांच्या जीवनात त्यांच्या लहानपणापासून जीवनभर त्यांच्याशी एकनिष्ठेने राहून आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या प्रत्येक मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहातून केले आहे. 
   या काव्य संग्रहातून कवयित्री मीनाक्षीताई यांनी स्वराज्याच्या कामी शिवाजी महाराजांना साथ देणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील  ३० मावळ्यांना अतिशय मानाचे स्थान देवून यथोचित वर्णन केले आहे. " हर हर महादेव , छ्त्रपती शिवाजी महाराज की " अशा घोषणा दिल्या की आज ही अंगात नव चैतन्य संचारते . त्याच गर्जना देत या मावळ्यांनी शिवरायांच्या साथीन इतिहास घडविला . मावळा म्हटल की घोडयावर स्वार झालेला कमरेला तलवार , पाठीला ढाल असणा-या सरदाराचे चित्र डोळ्यांपुढ उभे राहते . 
           या कवितेचे प्रथम पुष्प स्वराज्यासाठी बलिदान देणारा शूर योध्दा प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवा काशिदचे गुंफले असून शेवटचे पुष्प बेलसरच्या लढाईत मर्दुमकी गाजवणाऱ्या समशेर बहाद्दर बाजी सर्वेराव जेधे यांच्या पराक्रमाचे काव्य पुष्प गुंफले आहे .
      होता जिवा म्हणून वाचला  शिवा अशी ओळख असलेल्या कुस्तीवीर जिवा महाला, आग्ऱ्याच्या कोठडीतील मदारी व  हिरोजी फर्जंद. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणत ज्याने सिंहगडावर पराक्रम गाजवणाऱ्या शूर वीर  तानाजीचे , शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ , औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या संताजी - धनाजी, समुद्र किनारी दरारा असणाऱ्या कान्होजी आंग्रे, घरदार , जमीन विकून रायगड किल्ला बांधणाऱ्या हिरोजी इंदलकर ,संभाजी राजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या कवी कलश यांचे वर्णन काव्यातून केले आहे.

    वेशांतर करी । नकला हो करी।
    बोलण्यात भारी । पडतसे।।

    या वरील ओळींमध्ये बहिर्जी नाईकांची चपळाई लपली आहे..शत्रूच्या समोर त्यांच्या सैनिकात वेशांतर करून जरी बहिर्जी घुसले तरी शत्रूला ते समजत नसे...इतके पटाईत सराईतपणे वेशांतर करून शत्रूच्या छावणीत घुसून खडानखडा माहिती काढणारे बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते...

      शेवटचा श्वास । लढत राहिले ।
      शौर्याने लढले । संताजीही ।

या अभंग प्रकारात ओवलेल्या उक्तीप्रमाणे आपल्या जिवाजी पर्वा न करणारा,स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे धनाजी व संताजी यांनी फार त्वेशाने, शौर्याने शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले...केवढी ती निष्ठा आणि केवढे ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर,जिवाला जीव देणारे मुठभर मावळ्यांना एकत्र घेवून लढणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सा-या विश्वाला वंदनीय,पुजनीय व स्फुर्ती देणारे आहेत...

       वीर, शूरवीर , झुंजार,रण झुंजार  , सरनोबत, समशेर बहाद्दर , रांगडागडी , पैलवान, गुप्तहेर , प्रति शिवाजी असे प्रत्येक शुराचे वर्णन आपल्या काव्यमय उपाधीने करून त्यांच्या कार्याचे वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे. या काव्यसंग्रहामधील स्वराज्याच्या मावळ्यांचे रसमय वर्णन काव्यांजली , अभंग, मुक्त छंद, अष्टाक्षरी या काव्यरचना प्रकारांमध्ये केले आहे. 
 प्रत्येकाकडे "स्वराज्याचे मावळे " हा काव्यग्रंथ  असावा व तो अवश्य वाचावा असे मला वाटते. 

स्वराज्याचे वीर I वीर शौर्यगाथा ॥
टेकविते माथा I मिनाक्षीचा ॥

         या काव्यपंक्ती मधून कवयित्री मिनाक्षी ताईंनी आपला या शूर वीरांबद्दल आदर व्यक्त केला आहे.चिमुकल्या विद्यार्थ्यांना इतिहास जेवढा शिकवावा आणि मिनाक्षी ताईचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे... महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलांदा इतिहासावर काव्य रचले गेले आहे.याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे...प्रत्येक शाळेत व घराघरात बालकांच्या हातात असावे असेच हा "स्वराज्याचे मावळ" हा काव्यसंग्रह आहे...

   मिनाक्षीताईंबद्दल दोन शब्द
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे या एक आदर्श शिक्षिका असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. 
  मिनाक्षीताई नागराळे आमच्या राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या ONLY SUPER ACTIVE समुह प्रशासक आहेत. गेल्या ४/५ वर्षापासून त्या समुहामध्ये काम करत असून त्यांनी  अनेक ऑनलाइन कार्यशाळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना तंत्रज्ञानाचे धडे शिकविले आहे. त्या आमच्या समुहाच्या ONLY SUPER ACTIVE  तंत्रस्नेही प्रशासक असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे (साळुंके) पाटील यांना या संग्रहानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा  ! 


 --- श्री. सुदाम नारायण साळुंके सर
           तंत्रस्नेही  शिक्षक
             समुह प्रमुख - 
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
प्रशासक - प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र 
  कोपरगाव , जि. अहमदनगर 
    मो. 8830334810

---
Shared using https://www.writediary.com/getapp



http://menakshi1412.blogspot.com/2020/04/blog-post_8.html


*"स्वराज्याचे मावळे" तरूणांना स्फुर्ती देणारा काव्यसंग्रह...  आदरणीय श्री सुदाम दादा साळुंके..यांचे सुंदर समीक्षण वाचा आता माझ्या ब्लॉगवर....*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शिक्षणाचे महत्व मानवाचा सर्वागीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. तसेच माणूस आणि पशु या दोघांमधील अंतर ओळखायचे साधन म्हणजे शिक्षण होय. प...